भावविश्व

................तरंग मनाचे!

गैरसोय


             शरीराचा एखादा अवयव दुखायला लागल्यावर आपण त्याच्याकडे जरा जास्तच लक्ष देऊ लागतो. आतापर्यंत अगदी व्यवस्थितरित्या, आपल्या नकळत चालणारं काम अचानक चालेनासं होतं आणि आपण बिथरतो. कारण काय? तर, हव्या असलेल्या क्षणाला न झालेलं काम. वर्षानुवर्षे अगदी न चुकता काम करत आलेल्या त्या अवयवाची किंमत आपल्याठायी काहीच नसते.एखाद्यावेळी होणाऱ्या गैरसोयीशिवाय नेहमी होणाऱ्या सोयीची किंमत कळत नाही.

             तसंच काहीसं नात्यांचंही.....! आपण आजवर 'समजुन' घेत असलेली व्यक्ती अचानक 'वेगळं' काहीतरी वागायला लागते आणि आपल्याला अचानक आभास होतो.... ती व्यक्ती नेहमी आपल्या पाठीशी त्याच तन्मयतेने आणि निष्ठेने उभी राहिल्याची, मात्र आपणच प्रसंगी केलेल्या दुर्व्यवहाराची ...कुणीतरी नाराज होत असेल, आपल्याला टाळत असेल, तर आपण त्या व्यक्तीकडे अधिकच आकृष्ट होऊ लागतो..... कदाचित जगातल्या इतर सगळ्यांपेक्षाही....

             शरीरासारखंच नात्यांचीही काळजी घेणं आपल्या हातात नाही का? काहीतरी (बि)घडण्याच्या आत काहीतरी सावरणं, हेच जगणं नाही का?

~मितेश शहा

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रिया द्या!