भावविश्व

................तरंग मनाचे!

'मधला प्रवास'

                         प्रश्न हा मनुष्य जीवनाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. पावलोपावली माणसाला प्रश्न पडतात, आणि हे प्रश्नच आयुष्याची नवनवीन उत्तरं शोधायला मदत करतात.ही उत्तरं जाणून घेण्यासाठी अंतर्मनाचा नादही ऐकायला हवा. या ऐकण्यावरच प्रत्येकाचं यशस्वी किंवा अयशस्वी होणं ठरतं.

                        आपलं मन सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण त्याला ठरवून दिलेल्या आवडी-निवडीनुसार प्रतिक्रिया देत असतं. त्या मनाला तुम्ही आतापर्यंत घातलेल्या खतपाण्यावर ही प्रतिक्रिया अवलंबून असते. माणसाने नंतर केलेली प्रत्येक कृती हे त्या उत्तराकडे टाकलेलं पाऊलच होऊन जातं. हे उत्तर चांगलं की वाईट हेसुद्धा त्यावरच ठरतं.

                       प्रश्न जन्मासारखा असतो तर उत्तर मृत्युसारखं. त्या उत्तरानंतर पुन्हा नवीन प्रश्न,आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी केलेला प्रवास.  प्रश्न पडल्यावर तुमचं अंतर्मन तुम्हाला किती आणि कसं साद घालतं यावर त्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याची वाट ठरते आणि त्यालाच 'जीवन' म्हणतात.

~मितेश शहा.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रिया द्या!