भावविश्व

................तरंग मनाचे!

जरा जपुन!

                        सहनशील माणसाचा अंत पाहू नये. सहनशील व्यक्तीचं मन एखाद्या नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यासारखं असतं. त्यात कितीही वेगाने येणारी दु:खं, त्रास बऱ्याच काळापर्यंत अडवली जातात. परंतु त्याच्या क्षमतांनाही किनारे असतात.

                        एकदा मर्यादा ओलांडल्यावर, नदीचा बांध फुटल्याप्रमाणे, अडवलेलं पाणी जसं आधीच्या वेगापेक्षा कितीतरी अधिक पट वेगाने वाहू लागतं तसंच, सहनशील व्यक्तिमत्त्वाचा माणूस आक्रमक होतो, तो कुणालाही जुमानत नाही. आतापर्यंत न पाहिलेल्या त्याच्या स्वरुपाचं दर्शन जगाला होतं. नेहमी रागीट दिसणारा मनुष्यही त्याच्यासमोर टिकाव धरु शकत नाही. त्याच्या मनातल्या जुन्या, कुठल्यातरी कोपऱ्यात दडवुन ठेवलेल्या सगळ्या भावना जागृत होतात आणि जगातल्या कुठल्याही शक्तीला सामोरं जाण्याची ताकद त्याच्यात येते.

                       ही प्रतिक्रिया म्हणजे राग कधीच नसतो. हा असतो संताप..!
                       मनुष्याच्या थेट ह्रदयातुन येणारी भावना कधीच अपुरी नसते. या भावनेचे प्रेम,संताप,आशीर्वाद असे वेगवेगळे स्वरुप असतीलही, परंतु, प्रत्येक रुपात प्रचंड उलथापालथ घडवण्याचे सामर्थ्य सामावलेले असते.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रिया द्या!